Followers

Tuesday, May 26, 2009

मराठी बाणा

"अशोक हांडे" हे नाव बरेच दिवस नव्हे तर बरेच वर्षे मी ऐकत होतो. त्यांचा "आवाज की दुनिया " आणि इतर अनेक कार्यक्रमाबद्दल मला फार उत्सुकता होती आणि एक दिवस "मराठी बाणा" हा कार्यक्रम पाहायचा योग आला.

125 कलाकार आणि अशोक हांडे यांची निर्मीती, दिग्दर्शन, कल्पना, सहभाग, निवेदन आणि गायन अशी बहुआयामी, बहुरंगी कमाल म्हणजे "मराठी बाणा".... कोकणातील एक आंबा विकणारा पण अफाट बुद्धी आणि कल्पना असणारा माणूस काय काय करू शकतो...

या कार्यक्रमाची सुरूवात होते अमर भुपळी पासून आणि तेथपसून तो कार्यक्रम मनाची अशी काही पकड गेतो की बस..... वासुदेवाच गीत, कोळी गीते, शेतीची गीते, भावगीते, भक्तिगीते, पोवाडे, गण, गौळण, महाराष्ट्रातील निरनिराळ्या सण आणि उत्सवाच्या वेळची गीते..... आणि हे सर्व गात असताना समोर कलावंतांनी त्या तालावर केलेली धमाल न्रुत्ये..... एका वेळेला साधारण पणे 40 ते 50 जण स्टेज वर न्रुत्ये करतात. त्यांची नृत्यातील तयारी, सफाईदारपणा हा नजरेस भरतो अगदी !!!

स्टेज चा वापर या कार्यक्रमात अतिशय उत्तम पणे केला आहे. मुर्तिमन्त गावाचा सेट, विठ्ठलाचे मंदिर, आणि त्याच्या मागे वादक कलाकार. गायक कलाकार सर्वजण स्टेज वर उभे आणि त्यांच्या पुढे नृत्य करणारे कलाकार.... स्टेज वरची 1 इंच ही जागा त्यांनी न वापरता ठेवलेली नाही.....

त्यांचा गाण्याची निवड सुद्धा अतिशय उत्तम आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमाची प्रकाशयोजना ही गाण्यांना एकदम एकरुंप अशीच आहे. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, चुक नाही. सामुहगाणात पण फोकस आणि प्रकाशयोजना अतिशय उत्तम. पिवळ्या आणि निळ्या प्रकाशयोजनेचा फार सुंदर वापर केला आहे. प्रकाशयोजनेवरती घेतलेले कष्ट नजरेत भरतात अगदी.....

हीच गोष्टा नृत्याच्या बाबतीत. समुहन्रत्यात अत्यावश्यक असणारे टाइमिंग जबरदस्त..... नृत्यावर्ती घेतलेले कष्ट लक्षात राहतात. नृत्याचा स्पीड आणि जोश कायम राहण्यासाठी कलाकार स्टेज वर येण्या आधीपासूनच नृत्य साइड स्टेज करत करतच स्टेज वर येतात ! त्याची वेशभूषा, केशभूषा ही नृत्याला अनुरूप अशीच बनवली आहे. त्यांचे दागिने हे सुद्धा त्यांच्या साडीला पीन अप केलेले असतात! बारीक बारीक गोष्टींचा फार विचार केलेला दिसतो.... कलाकारांची नृत्यातली एनर्जी पाहण्यासारखी आहे. वन्स मोर घेऊन सुद्धा तेवढीच एनर्जी ठेवणे सोपी गोष्ट नाही. गायक कलाकार आणि न्रुत्य करणारे कलाकार यांच्यातील संवाद फार सुंदर आहे.

कार्यक्रमाचा स्पीड इतका जोरात आहे की प्रेक्षकांना विचार करायला फारसा वेळच मिळत नाही. प्रेक्षक त्या कार्यक्रमाचे एक भाग होऊन जातात ते त्यांचे त्यांनाच काळात नाही. पुरूष कलाकारांनी केलेले देवीच्या गोंधलाचे न्रुत्य असो किंवा सर्व कलाकारांनी मिळून केलेली दही हांडी असो, लग्नाची वरात असो किंवा कोळी नृत्य असो....कार्यक्रंतून दिला जाणारा संदेश सगळेच सुंदर आणि लक्षात राहणारे.....

सर्वांनी एकदाच नव्हे तर अनेकदा पाहण्यासारखा कार्यक्रम म्हणजे "मराठी बाणा" !!!