या
चित्रपटाची सुरुवात होते ती
गर्भवती मेरी रात्रीच्या
वेळी दवाखान्यात जात
असताना. त्याच
दरम्यान इंफाळ मध्ये संचार
बंदी असते आणि
तिथे सुरु होते
तिच्या कष्टाची सुरुवात. ती
कशीबशी
पोलिसांच्या मदतीने दवाखान्यात पोचते
आणि जुळ्यांना जन्म
देते. इथे चित्रपट
Flash back पद्धतीने पुढे सरकतो.
मणिपूर सारख्या ईशान्य भारतातील
एका छोट्या राज्यातून
हे रत्न सापडणे
हे खरं तर
अखिल भारतीयांना लागलेली
lottary आहे. घरची अत्यंत
गरिबी, मजुरी करून पोट
भरणारे आई वडिल.
तीन मुलांमध्ये थोरली
असल्याने घरात करावी
लागणारी कामे, गरम डोक्याची
आणि अन्याया विरुद्ध
मारामारी करणारी मेरी पुढे
बॉक्सिंग मध्ये कशी पुढे
गेली हे पाहणे
हे फारच रोमांचकारी
आहे. करियर च्या
उंचीवर असताना तिने घेतलेला
लग्नाचा निर्णय, तिच्या गुरूंनी
केलेला सक्त विरोध,
पुढे झालेली जुळी
मुले, त्यांचे संगोपन,
या सगळ्यातून परत
ग्लोव्ज चढवून परत विजेती
झालेली मेरी हा
सर कथाभाग चांगला
रंगवला आहे. बॉक्सिंग
फेडरेशन पुढे तिला
माफी मागायला लावणे, काहीही न
खाता बॉक्सिंग साठी
उतरणे, लग्न म्हणजे
आता करियर संपले
असे सदा हिणवणे,
मुलांच्या संगोपनात तिची होणारी
धावपळ या आणि
अशा अनेक गोष्टी
डोळ्यात पाणी आणतात.
ईशान्य
राज्ये ही कायमच
भारतापासून वेगळी असल्याचा केलेला
प्रयत्न आणि त्यामुळे
होणारी मानसिक घालमेल इथेही
प्रकर्षाने जाणवते.
या
चित्रपटात सर्वांनीच फार मनापासून
कामे केली आहेत.
विशेष कौतुक करायचे
ते प्रियांका चोप्राचे.
खरंतर मेरी कमी
उंचीची आणि बारीक
चणीची. फक्त ४६
किलो वजनाची. पण
प्रियांकाने उंच असूनही
तिच्या कष्टाने आणि अभिनयाने
या भूमिकेला चार
चांद लावले आहेत.
कुठेही चित्रपटात अतिशयोक्ती नाही,
किंवा अनावश्यक बडबड
नाही. सर्व गीतेही चित्रपटाच्या कथेला
अनुसरून आणि चपखल
अगदी अंगाई गीत
सुद्धा.
या
चित्रपटाची "भाग मिल्खा
भाग" शी तुलना
होणारच. पण ती
तसे करणे योग्य
होणार नाही. मी
फक्त एवढेच म्हणेन
की फरहान अख्तर
जशी मिल्खा सिंग
ची भूमिका जगला
आहे तद्वत प्रियांका
मेरीची.
या
चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या नवीन
पिढीने काही प्रमाणात
का होईना खेळ
या विषयाकडे गांभीर्याने
पाहिले आणि त्यातून
काही खेळाडू जन्माला
आले तर या
चित्रपटाचे सार्थक झाले असेच
म्हणता येईल…
-
मंदार
कुलकर्णी
9 Sep. 2014
No comments:
Post a Comment