Followers

Tuesday, October 3, 2017

मुंबई

 
जो तो येतोय मुंबईमध्ये म्हणतो येथेच पोटाची खळगी भरणार ।
मुंबईत झालीय अपार गर्दी त्याला कोण काय करणार .... ।। धृ ।।
 
एकेकाळी ७ बेटांचा समूह इंग्रजांनी जोडला
रस्ते आले ट्रेन आली वाहतुकीची साधने आली
पण या रस्त्यावरून अजून किती लोक जाणार ... ।। १ ।।
 
मुंबईचे गिरणगाव झाले कोकणातून माणसे आली
देशावरची माणसेही नशीब अजमावयला इथेच आली
रेल्वे रूळ १५० वर्ष तेवढेच राहिले त्याला कोण काय करणार... ।। २ ।।
 
स्वातंत्र्यानंतर मुंबई आर्थिक राजधानी झाली,
मोठे कारखाने कंपन्या आल्या, देशा परदेशातून ज्ञान आले
लोकवस्ती आता वसई विरार पुढे गेली त्याला काय करणार ... ।। ३ ।।
 
सगळ्यांना मुंबई हवी, पोसायला आणि कमवायला
इज्जत हवी, पैसा हवा, शान आणि मान हवा
अहो, अंबानीनाही २७ मजली 'अँटीलिया' बांधायला हीच मुंबई मिळणार ... ।। ४ ।।
 
किडा मुंगी सारखे मरतायत माणसे रोज किंमत नाही राहिली
फुटपाथची पागडी आता लाख आणि कोटीत गेली
बॉंबस्फोट होऊनही पोटासाठी त्यांना लगेच बाहेर पडावे लागणार ... ।। ५ ।।
 
'मन्नत' असो वा 'जन्नत' प्रत्येकाला मुंबईत घर हवे आहे
सरकार ही दर ५ वर्षांनी झोपड्या नियमित करायला बसलेच आहे
मुंबईचा श्वास गुदमरलाय त्याला कोण मोकळे करणार ... ।। ६ ।।
 
- मंदार कुलकर्णी
दसरा २०१७
30 sep

No comments:

Post a Comment