Followers

Monday, April 29, 2019

उन्हाळा


सध्या सगळीकडे दोनच बातम्या पहायला, वाचायला आणि चर्चेला दिसतात. निवडणूक आणि उन्हाळा... विशेषतः लोकसभा निवडणूक तर हटकून उन्हाळ्यात येते. ग्लोबल वोर्मिंग मुळे म्हणा, झाडं कमी झाली, वृक्षतोड झाली म्हणा पण आजकाल उठलं की सकाळ नसतेच, डायरेक्ट दुपारच येते आणि सूर्यास्त झाला तरी टिकून राहते. जळगाव आणि सोलापूर सारख्या कडक उन्हाळ्याच्या ठिकाणी राहिलेला असूनही मला या वर्षीचा उन्हाळा जास्त वाटतो आहे.

आज भर दुपारी काही कारण नसताना बायकोने बाहेर पिटाळले होते. तर कामे पटापट उरकून घर गाठण्यापूर्वी पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल भरली की हवा भरणे आलेच. तिथला मुलगा मला इतरांपेक्षा जरा वेगळा वाटला. इमाने इतबारे भर उन्हात खाली वाकून चाकात हवा भरायचे काम करत होता. वाहनचालक मंडळी स्वतः गाडीत बसून काच खालीही न करता त्याच्यावर रुबाब करत होती. कोणी पैसे द्यायचे, कोणी नाही.

मी माझ्या सवयीप्रमाणे गाडीतून उतरून त्याला हवा भरायची विनंती केली. इतका वेळ गाडीत ए सी लावल्यामुळे बाहेर किती भाजते आहे याचा अनुभव गाडीतून बाहेर आल्यावर मिळाला. सहज त्याला हवा भरताना विचारले, "तुला ऊन लागत नाही का रे?" तर म्हणाला, "लागतं की, पण... पण आता सवय झाली..." मला नाही पटलं मनातून.

पटकन गाडीतून एक नवीन उन्हाची टोपी काढली आणि त्याच्या डोक्यावर घातली. नको म्हणाला. "असू दे, ऊन सगळ्यांना सारखंच लागतं. तू ही टोपी रोज वापर बाबा..." त्यानं पण माझा मान राखत मंद स्मित करत टोपी घातली आणि thank you म्हणाला... आणि मी निघालो.

एखाद्याच्या आयुष्यात गार वाऱ्याची झुळूक आणली नसली तरी उन्हाळा थोडा कमी शकलो मी....

मंदार कुलकर्णी

Sunday, April 14, 2019

मोदी सरकार 300 के पार

मोदी सरकार 300 के पार
- मंदार कुलकर्णी
13 एप्रिल 2019


निवडणूक काळात अशी यमक जुळवलेली आणि पटकन पकड घेणारी वाक्ये टाकली की कसलं भारी वाटतं ना? गेल्या वेळेला 'अबकी बार मोदी सरकार' ही टॅग लाईन होती आणि मोदींनी 272 हा जादुई आकडा हा हा म्हणता पार केला होता. मी काही राजकीय विश्लेषक नाही पण गेल्या निवडणूक निकालाच्या दिवशी जेव्हा अगदी पहिले अंदाज (सध्याचा पॉप्युलर शब्द म्हणजे रुझान) यायला लागले तेव्हा मी एकच इच्छा देवाकडे मागितली होती ती म्हणजे NDA ला बहुमत तर मिळुदेच पण त्यापेक्षा भाजपा ला एकट्याने बहुमत मिळू दे. आणि झालेही तसेच. रुझान जेव्हा 250 च्या गेले आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सह अवघ्या उत्तर भारताने जे भरभरून भाजपा चे उमेदवार निवडून आले आणि त्याचमुळे संपूर्ण बहुमताचा आकडा पार करता आला.
30 वर्षानंतर प्रथमच भारताच्या मतदाराने एका पक्षाला इतकी मते आणि जागा दिल्या होत्या. खरं पाहता 1985 साली जे एका पक्षाला बहुमत मिळाले त्यात काँग्रेसच्या 5 वर्षाच्या कारभारापेक्षा इंदिरा गांधी यांची झालेली हत्या आणि त्याचे त्या सरकारने/ काँग्रेसने केलेलं भांडवल हा सर्वात मोठा मुद्दा होता. एका अगदी नवख्या आणि अनुनभवी माणसाच्या हाती देशाची सर्व सत्ता सोपवली जाणे असे चमत्कार फक्त भारतातच होऊ शकतात. तसाच एक चमत्कार 3 वर्षांपूर्वी केजरीवाल नावाच्या खोटरड्या आणि जोकर व्यक्तीला विधानसभेतील 95% जागा देऊन दिल्लीच्या जनतेने दिला होता. पण असे अपवाद असायचेच. Brexit ला मतदान करणाऱ्या इंग्लंड च्या जनतेला आता परत फेरविचार करायची पाळी आलीच ना?
आता वेळ आली आहे परत मतदानाची. 2019 च्या मतदानाची पहिली फेरी पार पडली पण विरोधी पक्षांनी खोटे बोलणे सोडलेले नाही. 'चौकीदार चोर है' पासून अनिल अंबानीच्या खिशात 30000 कोटी घातले, निरव मोदींच्या घशात 15 लाख कोटी घातले असा अखंड खोटेपणाचा रतीब काँग्रेसने लावला आहे. 35000 कोटींचा सिंचन घोटाळा करणारी मंडळी, यांना 'लाज कशी वाटत नाही' सारख्या उथळ आणि खालच्या पातळीच्या जाहिरातींनी अवघा महाराष्ट्र दणाणून टाकत आहेत. ₹72000 वार्षिक आर्थिक मदत देण्याचे गाजर दाखवून देशभर मत परिवर्तनाचा डाव मोठ्या हुशारीने घातला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद नसताना लोकांना फुकट बसून आणि काम न करता खायची सवय लावणारी काँग्रेस आणि गेली 70 वर्ष निवडणुका जवळ आल्या की 'गरिबी हटाव' चा नारा देणारी काँग्रेस आता कोणत्याही थराला जाईल अशी परिस्थिती आहे.
2019 मध्ये बाजी जिंकण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीतच आहोत. मोदी, शाह, फडणवीस यांच्यापासून भाजपाचे अनेक नेते जीवाचे रान करत आहेत. पण या वेळचा सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे नव मतदार आणि मतदानाचा टक्का वाढवणे. मोदींनी NRI ना या मतदानात समाविष्ट करायचा भरपूर प्रयत्न केला. NRI त्या त्या देशाच्या एम्बसित जाऊन मतदान करू शकतील असे विधेयक मोदी सरकारने लोकसभेत आणले, ते तेथे पारितही झाले पण काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे राज्यसभेत मान्यता मिळवू शकले नाही. जोवर राज्यसभेत भाजपा ला बहुमत मिळत नाही तोवर हे विधेयकच काय पण तीन तलाक सारखी असंख्य विधेयके पास होऊ शकत नाहीत. राज्यसभेत संख्या बळ वाढवण्यासाठी लोकसभेत संख्याबळ अजून वाढवणे आवश्यक आहे.
"मतदान हा आपला हक्क आहे" हे नागरिक शास्त्रात शिकलेले वाक्यच आजच्या काळात गैरलागू आहे. "मतदान हे आपले परम कर्तव्य आहे" हे वाक्य वाक्य आता जनामनात रुजवायला हवे. निवडणूक आयोग, सरकार आणि न्यायालय यांनी एकत्र बसून मतदान न करणाऱ्या आणि मतदानाच्या दिवशी सुट्टी काढून ट्रिपला जाणाऱ्या मंडळींना काय शिक्षा करता येईल याचा विचार करायची वेळ आली आहे. लोक बदली झाली, गाव बदललं तरी मतदार यादीतील नाव दुरुस्त करून घेत नाहीत. मतदार यादीत नाव असूनही मतदानाला जात नाहीत, या सारखी शोकांतिका काय असू शकते? निवडणूक आयोग मतदारांना नुसती पाण्याची व्यवस्था करत नाही तर आज मतदात्याच्या लहान मुलांसाठी त्या दिवशी पाळणाघराचीही सोय करत आहे, हे किती जणांना ज्ञात आहे?
आज गरज आहे ती समाज जागृतीची आणि मतदारांना मतदान केंद्रावर ओढून आणायची. आपण सारे यात सहभागी होऊया. मतदानाच्या दिवशी जगातील कित्येक अनिवासी भारतीय स्वतःच्या खर्चाने केवळ त्यांचे एक मत देण्यासाठी हजारो/ लाखो रुपये पदरचे खर्च करून भारतात येत आहेत. निदान त्याची तरी कदर भारतातील घरी बसून मजा करणाऱ्या मतदारांनी करायला हवी. 'मतदान' ह्या शब्दाच्या जागी 'मत देणे' हे Must काम करायला लोकांना प्रवृत्त करायला हवे. ज्यांना आपले मतदान केंद्र माहीत नाही त्यांना माहिती करून देणे, मतदार यादीत नाव शोधून देणे, मतदान केंद्रापर्यंत जेष्ठ नागरिकांना वाहनांची सोय करणे अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतील.
लक्षात ठेवा, मतदानाचा टक्का वाढला की यश मोदींनाच. यश मोदींना मिळणार आहेच पण त्यासाठी आपण काय खारीचा वाटा उचलू शकतो याचा आपण विचार करूया आणि कामाला लागू या...
चला तर मग,
फिर एक बार, मोदी सरकार !!!!
(ज्यांना ज्यांना शक्य आहे, छे... सर्वांनाच शक्य आहे, हा लेख जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा प्रयत्न करू या. व्हाट्स अँप आणि फेसबुक वर अनुक्रमे फॉरवर्ड आणि शेअर ही बटणे आहेत... 😊)

Thursday, April 11, 2019

Mumbai Bangluru Traffic issues...

From the month of Jan, there is a bridge work started near Sutarwadi on Mumbai Bangalore highway. As usual, the authorities created a small diversion and pushes all vehicles to pass through that. Highway is 3 lane whereas diversion is 2 lane or even less than that. Everyday there used to be huge traffic jam at that location during morning and especially in the evening hours. The people from Hanjwadi, Baner and Mumbai creates lot of traffic between 6pm to 10pm. Everybody is in a hurry and want to go home.

I am also one of the affected members. With this, I started talking to highway police. They diverted to Pune Police. They pushed me to PCMC police and finally they asked me to talk to National highway authority people. It took a while for identification of right agency and right people but finally I reached to the right person. He also took his own sweat time to get convinced but I keep on pushing for solution. Finally yesterday they agreed for trial at the location.

I simply asked them to reduce the angle of conversation of 3 lanes to 2 lanes by putting barricades and pushed last lane vehicles to the middle lanes.
Interestingly, we could see some improvement. Though the traffic was slow, it was moving unlike complete vault. I was at that location for while and took promise them to follow the same practice till the work gets completed. Here are some of the photos at the location...

Let us hope, the authorities will continue to use my idea which will help thousands of people coming in the evening....

If you happen to pass through that location, please see if this continues... Thanks.
- Mandar Kulkarni

Hinjawadi traffic



Today I had a fruitful meeting with PI Kishor Mhasawade. He is the person who stream lined the traffic of Hinjawadi to the large extent.... He had lot queries regarding Google Maps and was very keen to know about it. He also checked how the traffic direction and real time traffic near Shivaji Chowk on Google maps. Interestingly, he observed that people are lying and claiming that Google map only asking to go in One Way !!!

There is lot of online updation work needs to done as now a days every body uses Google maps.... As the same time, it is everybody's responsibility to follow traffic rules, like using helmet, not to barge in One way etc....

Please note that, due to pipeline works, road from Shivaji Chowk to Wakad bridge would be closed for next few weeks... Rest assured, the traffic changes would be communicated well in advance through press, flex and online as well !!!

Mandar Kulkarni
8 April 2019