Followers

Saturday, November 2, 2019

छठपूजेचे आक्रमण



माझी शिवसेना किंवा मनसेच्या इतकी उत्तर भारतीय लोकांबद्दल आत्यंतिक मते अजिबात नाहीत. भारतीय संविधानात लिहिल्याप्रमाणे भारतात कोणीही, कुठेही आपला गाव, प्रदेश, राज्य सोडून राहू शकतो, नोकरी करू शकतो, व्यवसाय करू शकतो. सर्वांनी गुण्या गोविंदाने एकत्र नांदावे हीच माफक अपेक्षा आहे. बाहेरच्या लोकांनी येथील संस्कृती मध्ये सामील व्हावे, तेथील भाषेला आपलेसे करावे आणि इथलेच होऊन जावे.

गेल्या काही वर्षातील पुण्यातील आणि महाराष्ट्र्र प्रदेशातील एकंदर सांस्कृतिक घडामोडी पाहता बऱ्याच वेगळ्या गोष्टी घडत आहेत असे दिसते. साधारण २ - ३ दशकांपूर्वी महाराष्ट्रात फारसे पर राज्यातील लोक येत नसत. आले तरी थोडेफार गुजराथी, मारवाडी लोक.  व्यवसाय करण्यासाठी येणारे पुण्या मुंबई पर्यंत मर्यादित होते.

काही काळानंतर उत्तर भारतातील लोंढे महाराष्ट्र प्रदेशात येऊ लागले आणि त्यांनी बहुतेक प्रदेश आता काबीज केला आहे. सुरुवातीस मिळेल ते काम आणि मिळेल तिथे राहणे अशी कसरत करीत पुढे आपले भाऊ, बहीण, काका, मामा, इतर नातेवाईक त्यांनी आणायला सुरुवात केली. कारखान्यात मिळेल ते काम करत राहिले. हळूहळू सर्व किराणा भुसार दुकानात आधी नोकरी आणि आता मालक होण्याचा प्रवास अनेकांच्या लक्षात आला असेल. आधी गोड हिंदी बोलून लोकांची मने जिंकणाऱ्या या मंडळींनी घरपोच किराणा देऊन मराठी लोकांना अजूनच आळशी बनवले. हळूहळू भाजी, रोजच्या जीवनावश्यक गोष्टी सुद्धा आता कोपऱ्यावरील यांच्या दुकानात मिळू लागल्या आणि मराठी माणूस मंडई मध्ये जायचे सुद्धा विसरला.

'कितने को दिया भय्या ----' पासून चा हा प्रवास 'भाव न विचारता' आयत्या घरी वस्तू यायची आता सवय झाली. मराठी माणसाचा आळस, नाकर्तेपणा, व्यवसाय न करायची वृत्ती आणि कष्ट न करता दिवसभर मोबाईल वर टाइम पास करायचा. याच गोष्टीचा या चतुर लोकांनी फायदा घेतला.

आज हीच मंडळी किती शिरजोर झाली आहेत याची काही प्रातिनिधिक उदाहरणे:

उदाहरण १: कोपऱ्यावरील दुकानदाराकडे आजकाल जो खपेल तोच माल असतो. आपल्याला काही वेगळी वस्तू हवी असल्यास ती मिळतच नाही.

उदाहरण २: कबुतरांच्या विष्ठेतून दम्या सारखे आजार पसरतात हे सरकारनेही मान्य केले आहे, तरी सुद्धा रोज सकाळी दुकान सुरू होताना काही मुठी ज्वारी या कबूतरांसाठी टाकली जाते, रोज च्या रोज या कबुतरांची संख्या प्रचंड वाढत आहे. बाकी कशाला, महाराष्ट्र राज्याचा देव विठ्ठल मंदिर, त्या मंदिराच्या आवारातही सर्रास रोज ज्वारी कबूतरांसाठी टाकली जाते आणि मराठी माणूस काहीही करू शकत नाही. त्यांना सांगितले तर हम ऐसाही करेंगे अशी बेदरकार भाषा वापरली जाते.

उदाहरण ३: गेल्या २ दिवसापासून छठ पूजा सुरू आहे. पुण्यातील नदी काठचे रस्ते काल संध्याकाळी आणि आज सकाळी बेकायदेशीर पणे बंद केले गेले होते. आणि मराठी माणूस काहीही करू शकत नाही.

अशी बरीच उदाहरणे देता देतील. आताच या गोष्टींचा विचार नाही केला तर मराठी माणूस महाराष्ट्रातून कायमचा हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.

- मंदार कुलकर्णी
३ नोव्हेंबर २०१९


No comments:

Post a Comment