Followers

Monday, December 30, 2019

भारताची डिजिटल साक्षरता

नोटबंदी आणि 2016 साल हे खऱ्या अर्थाने बऱ्याच बदलांची नांदी आहे असे म्हणता येईल. सुरुवातीला सर्वांनाच एक किंवा दोन हजार रुपये बँकेच्या आपल्याच खात्यातून मिळण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले होते आणि मीही त्या त्रासाचा एक भाग होतो. हळूहळू नवीन नोटा मिळायला लागल्या पण त्याचबरोबर ऑनलाइन wallet आली आणि ती वापरायला अनेकांनी अनिच्छेने का होईना वापरायला सुरुवात केली. काहीजण पेटीएम किंवा तत्सम wallet वापरायचे आणि त्यात जर आपल्याला कोणी पैसे पाठवले तर विनासायास आणि विनाखर्च आपल्या बँकेच्या खात्यात एका क्षणात पाठवता येत असत.

डिजिटल पेमेंट ची ही खऱ्या अर्थाने भारतात कुठेतरी सुरुवात होती. अनेक मंडळींनी सुरुवातीला याला प्रचंड विरोध केला. नगद पैसेच हवे, 500 रुपये च्या वर असेल तर wallet किंवा कार्ड घेऊ असा माज अनेक दुकानदारांनी केला. कुठलाही बदल हा माणसाला नको असतो, मग तो रोजच्या कामात असेल किंवा व्यवहारात असेल. डिजिटल पेमेंट साठी या विविध कंपन्यांनी अनेक क्लुप्त्या शोधून काढल्या. पैसे wallet मध्ये भरले तर 10% कॅश बॅक पासून अनेक. एकाने दुसऱ्याला रिफर केले तर इतका कॅश बॅक आणि अनेक...


आज डिजिटल पेमेंट ची काय परिस्थिती आहे? या लेखाबरोबर मी दोन फोटो जोडले आहेत. पहिल्या फोटोत एक भाजीवाला हातगाडीवर भाजी विकतो त्या हातगाडीचा आहे. बारकाईने पाहिलात तर तोही ऑनलाइन wallet किंवा गुगल पे ने पैसे स्वीकारतो! दुसऱ्या फोटोत तर तुम्हाला कदाचित काहीच दिसणार नाही. आमच्या घराच्या कोपऱ्यावर एक मावशी रोज पेरू विकतात. एक छोटेसे लाकडी बॉक्स आणि त्यावर पेरुची टोपली. त्या सुद्धा गुगल पे पैसे स्वीकारतात! ह्या दोनही व्यक्ती अजिबात खळखळ न करता डिजिटल पेमेंट अगदी मनापासून सपोर्ट करतात.

भारताच्या प्रगती साठी डिजिटल पेमेंट किती फायदेशीर आहे हे या गरीब, अशिक्षित मंडळींना कळले पण आपल्याला आणि विशेषतः दुकानदार मंडळींना कधी समजणार?

मंदार कुलकर्णी
29 डिसेंबर 2019

Friday, December 27, 2019

Four decades of fond memories - Village of memories - Palaspe



Somebody asked me to translate my Palaspe article into English. Since I had limited time, I took help from Google. Frankly, Google needs to improve a lot on translation skill and I need to intervine my lines to continue the connect between lines. Hope you would also read this keeping the expectation LOW… 😊😊
__________________________________________________________________________________

Four decades of fond memories
Village of memories - Palaspe

In my entire family, no one had heard the word Palaspe before 1980. My father relocated to Panvel and thought that it would be easy for him to live in Palaspe, he had a small home in Raje's place. In fact, Baba did not find a rented house in Panvel, although he tried a lot. Then someone pointed out this address. Most of the job-seekers in Panvel to prefer to stay in Palaspe. Panvel Palaspe Distance is just 3 km. The travel is done by bicycle. Although Panvel is 50 km away in Mumbai, the civilisation of Mumbai did not started in Panvel at that time. It maintains its our separate identity. Although all the government affairs in the district of Kulaba operated through Alibag, many government offices were in Panvel. The national highway Mumbai-Pune routes through Panvel and Mumbai Goa National Highway was started near Panvel and it was a place called Palaspe Phata. This is how we would introduce the village to the guests and the relatives.






At that time, with no transportation and abundance of travel equipment, most of the visitors from Pune or Ahmednagar got off the bus at Palaspe Fata and used to walk to our house. It was a bit difficult to reach Panvel, change the bus and reach back to Palaspeby catching the bus for the route Pen, Alibag, Shrivardhan and request the driver to get off at Palaspe. The driver of the long-haul bus did not even agree to stop for a moment at Palaspe. Another identification of Palaspe village is the old Banyan tree near the bus stop. The tree, which has been standing for at least two centuries, is a witness to all the events of the village's 19th and 8th centuries.

For me, Palaspe was the ideal village forever as I spent my childhood for 4 years. This village was home to some hundreds of people, even with a typical Wada culture. Many homes in the village had no electricity at that time. A small river was flowing through the village. On the bank of the river stood a temple of Shankar and a temple of Vishnu, with a statue of Hanuman standing beside it. There were main 2 things from the farm rice and mangoes. Everything else had to be brought from Panvel, even the daily newspapers had to come on a bicycle from Panvel and then reach home.

Palaspe is a village in Konkan, with plenty of rainfall and main crop as rice. We used to go from school to help in the farm with permission from the school. Although it was fun element for us, those who had farming had to work a lot. At the beginning of the monsoon, when the hand constellation begins, plough the field, after a little rain or sow the paddy to a certain part of the field, then after a lot of time the seedlings can be removed and transplanted. Harvesting, weeding and many other tasks when the crop is ready. Mango was abundant in the village, but it does not as tasty as the Ratnagiri Hapus. The roaring rains do not want to change the style of living even in the rain.

It must be a surprise for you to note that the primary school in our village was 150 years old. Vasudev Balwant Phadke, India's first freedom fighter, studied in the school. His village is close to here. At that time, the village was home to many Brahmin congregations even the people of the Katakari community, used to stay here. Being a village on the highway, trucks and big vehicles used to get loud at night. There were frequent accidents on the highways and the villagers used to rush to help. We used to be afraid to walk the highway at night, even at night.


In 1983, when we bought the TV first time, the whole village used to watch TV at our house. There was no cable TV or dish TV. Even the low capacity television power stations had not arrived. Therefore, a large antenna had to be installed on a high ceiling to get a signal from the Mumbai Television Center to watch the TV. There were about 100 people sitting in the front room and door of our house watching it. Sarpanch had a TV in his house but people were afraid to go there. We had no such problem.

Even though there is a lot of rain during the monsoon, the water was very scarce for the remaining 8 months. I remember well, my mother and I walked miles to get water. The Katakari community was also very poor. They used to walk for so long, breaking the wood in the forest of the Karnala fort, twisting it and they would get Rs. 5 or 10. Even though we had electricity, most of the houses in the village were dark at night. Most of the children in the village used to study in the candle light. At that time I uded to ask, I have electricity in my house then how can they not have it? The answer was never answered, but now it does. Extreme poverty was seen very closely.

Another feature of Palaspe village is the neighbouring Karnala fort. A bird sanctuary was also built there. Shivaji Maharaj, who had won the fort after his release from Agra, included the Karnala fort in swarajya himself. The top of the Karnala fort was easily visible from anywhere in the nearby area. We were excited to make the day trip to Karnala to all the relatives.

Our neighbourhood was also very good at Palaspe. We used to celebrate many festivals like Vatpurnima, Hartalika, Ganapati, Dussehra, Diwali, Kojagiri. These same people gave us lot of support in the face of adversity.

I recently made a day trip there to brighten up the memories of Palaspe village and immediately noticed that our village has now changed. Things and distances that seem so long as a kid are starting to seem very small to me today, but I was also feeling the change over time.

The famous Goa highway has a big fly-over at Palaspe. The geography is changed due to the Jawaharlal Nehru Port Trust inception in 1989. Traffic in this area has increased multi-fold due to a whole new road from Palaspe Fata to JNPT. Container yards has grabbed all farms in this entire area. Going past the paddy fields there are huge size containers. Some farmers have leased their land to large auto companies. Overall, farm land has reduced day by day. The school has a new building but it could not create connect with me. It was nice to meet some of the oldest folks left in the village. The old memories woke up again. Rice Bhakari, that aroma of rice once again took me back 40 years to rice fields.

Today, the Navi Mumbai border extends beyond Panvel. The name of Navi Mumbai, with its sweet and cute name. The population headed east, and his waves swept across the country like a well-drained slope. Palaspe Fata has become a major outpost for vehicles traveling to JNPT, not just a place. One flyover on the other, ongoing work and on the other side Mumbai skyscrapers. Earlier, we had a great appreciation for a bus starting from Panvel to Mumbai and Thane every hour. Today, Mumbai has swallowed Panvel and Palaspe.

The project  of the new international airport is set to open soon. Like "Navi Mumbai", "New Panvel" is expanding its orbit. I am afraid that after a few years in this wave of urbanization, numerous villages like Panvel, Palaspe, Shrivardhan, Taloja, Kolkha, Derwali and Ajivali are losing their identity. The fears have only become darker after seeing the advertisement address "New Panvel" of the ongoing construction project in Khopoli. At Lonavla Talegaon, advertisers have discovered a new word "Pumbai". The futuristic place in his mind is the bridge between Pune and Mumbai.

Most farmers in Palaspe today either sell land or secure their future by renting, but will they ever notice that their village identity is being gradually wiped out? ….

-        Mandar V Kulkarni
-        15 December 2019


Thursday, December 26, 2019

मोदींचे पंचवार्षिक नियोजन

*मोदींचे पंचवार्षिक नियोजन*


सध्या विविध विषयांवर विरोधी पक्ष प्रचंड प्रमाणात धुरळा उडवत आहेत. मग ये CII असो किंवा NRC असो. याआधी काश्मीर चे 370 कलम असो किंवा तिहेरी तलाक विधेयक असो. भाजपा जूनपासून एका पाठोपाठ एक वादळासारख्या एकेक गोष्टी आणत आहे. अनेक भाजपा समर्थक आणि विरोधात असलेल्या अनुभवी, वयस्कर मंडळीना यावर कशा पद्धतीने उत्तर द्यायचे हेच कळत नाहीये. अगदी मीडियातील तथाकथित हुशार आणि अनुभवी पत्रकारही या सगळ्या घटनांकडे पूर्वग्रहदूषित या एकाच पद्धतीने पेपरचे मथळे आणि दूरचित्रवाणीचे बातम्यांचे कार्यक्रम भरत आहेत.

हा सर्व घटनाक्रम आपल्याला नीट समजून घ्यायचा असेल तर 2013 पर्यंत मागे जावे लागेल. मोदी यांचे नाव पंतप्रधान म्हणून भाजपा कार्यकारिणीने ठरवल्यानंतर मोदी यांनी मित्र पक्षांच्या बरोबर जागावाटप ठरवताना आपली राष्ट्रीय प्रतिमा जनमानसात रुजविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ला एकट्याला 282 जागा आणि एन डी ए ला 300 च्या वर जागा मिळाल्या. त्यामुळे काही गोष्टी नक्की झाल्या. एक - मोदींना वाजपेयी यांच्या सारखे कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन मित्रपक्षांची मर्जी संभाळत सरकार चालवायची गरज नाही. दोन - भाजपाला एकट्याला 272 पेक्षा जास्त जागा असल्याने अत्यंत महत्वाची मंत्री पदे गरजेपोटी मित्रपक्षांना देण्याची आवश्यकता नाही. तीन - भाजपाच्या जाहीरनाम्यातील गोष्टी आणि मोदी यांच्या मनातील देश पुढे नेण्याच्या कल्पना त्यांना हव्या तशा पुढे नेता येतील. त्याच पद्धतीने शपथविधी झाल्यावर मोदी यांनी पावले टाकायला सुरुवात केली. सरकार स्थिर असल्याने पुढच्या लोकसभा निवडणुका 2019 मध्येच होणार याची त्यांना खात्री होती.

2014 आणि 15 या सुरुवातीच्या काळात केंद्र सरकार च्या कार्य पद्धती समजून घेणे, पुढील 5 वर्षांचे नियोजन करणे आणि त्या अनुषंगाने नवीन योजना सुरू करणे आणि जुन्या सरकार च्या चांगल्या योजना पूर्णत्वास नेणे अशा पध्दतीने त्यांनी कामे पुढे नेण्यास सुरुवात केली. यात संरक्षण खात्याच्या शस्त्र खरेदी पासून बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी पर्यंत आणि One rank one pention पासून सियाचीन मधील -40℃ मध्ये उभे राहणाऱ्या जवानांना केलेली मदत असो.

2016 मध्ये GST लागू केले. या शिवाय
देशापुढील काळ्या पैशाचा प्रश्न आणि चालू असलेली काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था पाहून नोव्हे 2016 मध्ये मोदी सरकारने "नोटबंदी" आणली आणि काळ्या पैशात काम करणाऱ्या आणि टॅक्स न भरणाऱ्या लोकांचे कंबरडे मोडले. हे करताना मोदी यांनी 50 दिवस लोकांकडून मागून घेतले आणि प्रचंड विरोध असतानाही नोटबंदी यशस्वी करून दाखवली. विरोधी पक्ष कितीही बोंब मारत असला तरी सामान्य माणूस ATM च्या रांगेत 2 महिने उभा राहूनही मनातून सुखावला होता. काळ्या पैशावर घाला घालताना पुढील निवडणुका अजून 2.5 वर्षे लांब आहेत हे लक्षात घेऊन मोदी यांनी ही वेळ साधली गेली. तिहेरी तलाक बिल ही डिसेंबर 2017 मध्ये लोकसभेत पास केले.

त्यानंतर राफेल प्रकरण झाले आणि मोदी यांनी स्वतःला 'चौकीदार' आणि राहुल गांधी याला 'नामदार' ही पदवी दिली. राफेलचा अपेक्षेप्रमाणे प्रचंड धुरळा उडाला. राहुल गांधी याने "चौकीदार चोर है" चा जप अगदी पुढचे दीड वर्षे जपला पण शेवटच्या 1 वर्षात भाजपा ने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि 5 वर्षात जनमानसापर्यंत बऱ्याच योजना पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत तर पुन्हा मिळालेच पण स्वतः एकट्याने 300 चा टप्पा पार केला आणि NDA ने 350 चा.

या 5 वर्षाचे नियोजन करताना सर्वात जास्त अवघड, कष्टकर पण देशोपयोगी कामे मोदी सरकारने पहिल्या 2.5 ते 3 वर्षात केली. त्या गोष्टींना विरोध करताना विरोधी पक्ष सुरुवातीला मोठ्या उत्साहाने पुढे होते पण 2019 च्या निवडणूका होईपर्यंत ते पार दमून गेले आणि ऐन निवडणूक काळात महत्वाचे मुद्देच त्यांच्यापाशी राहिले नाहीत. मग कुठेतरी आठवून आठवून नोटबंदी नाही तर मोदी शाह यांची हुकूमशाही, अनिल अंबानी यांना मोदी यांनी कसे 30000 कोटी रुपये दिले असल्या पांचट विषयावर निवडणूक लढवली गेली. राहुल गांधी यांना अमेठीची स्वतःची जागा जिंकायची खात्री वाटेना तेव्हा मुस्लिम बहुल केरळ मधील लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवायची पाळी आली. तिथेच मोदी यांचा विजय नक्की होता.

मोदींच्या पुढे दुसरा प्रश्न होता तो म्हणजे राज्यसभेत नसलेले बहुमत. पहिल्या 5 वर्षातील अनेक विधेयके लोकसभेत पास झाल्यावर राज्यसभेत रखडली होती. त्यासाठी राज्यसभेत जागा वाढवणे गरजेचे होते. त्या दृष्टीने राज्यांच्या निवडणुका जिंकताना जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे गरजेचे होते. पण हे करताना ह्या राज्याच्या निवडणुका समोर आहेत म्हणून ही विधेयके आणायची नाहीत असे मात्र त्यांनी केले नाही. सर्वात प्रथम राष्ट्रहित हाच विचार मोदी यांनी केला. मोदी यांनी अजून एक चांगली गोष्ट केली ते म्हणजे उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू यांची अत्यंत चतुराईने केलेली निवड. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे चेअर पर्सन अर्थात अध्यक्ष असतात. गेली अनेक वर्षे कायम काँग्रेस प्रणित उपराष्ट्रपती असल्याने राज्यसभेचे कामकाज चालू असताना भाजपाला कायमच सापत्न वागणूक मिळत होती आणि भाजपा चे लोकसभेत बहुमतात असूनही राज्यसभेमध्ये त्यांना हवे तसे काम करू दिले जात नव्हते. व्यंकय्या नायडू हे प्रचंड अनुभवी तर आहेतच पण राज्यसभेतील खासदारांना कसे ठिकाणावर आणायचे हे त्यांना चांगले माहीत आहे.

2019 मध्ये बहुमत मिळाल्यावर मोदी सरकारने पुढील 5 वर्षांचे नियोजन केलेलेच होते पण आता त्यांना 2014 आणि 2015 मध्ये शिकण्यासाठी जो वेळ लागला तो आता घालवायची गरज नाही. आता सरकार बनल्यावर कधी कुठल्या गोष्टी अमलात आणायच्या एवढाच प्रश्न आहे. म्हणूनच नवीन सरकारच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनात काश्मीरचे 370 कलम रद्द केले. त्यापाठोपाठ मोटर वाहन कायदा, मानवी हक्क आयोग, NIA कायदा ते अगदी आता पास केलेले CII अशी तब्बल 28 बिले या सरकारने गेल्या 6 महिन्यात पास करून घेतली आहेत.

मोदींना पूर्ण कल्पना आहे की सरकारकडे भक्कम बहुमत आहे आणि 2024 पर्यंत लोकसभेच्या निवडणुका अजून खूप लांब आहेत. त्यामुळे पहिल्या 2.5 ते 3 वर्षातच देशाच्या प्रगतीला, देशाच्या सार्वभौमत्वासाठी आवश्यक ते सर्व कायदे मोदी संमत करून घेणार आहेत. कारण 2023 पासून पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे.

आता प्रश्न हा पडतो की ही घाई करताना मध्ये होणाऱ्या राज्यांच्या निवडणुकांचे काय? त्यांच्यावर या साऱ्या गोष्टींचा प्रभाव पडत नसेल काय? माझ्या मते नक्कीच पडतो आणि झारखंडला ही पडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर कशाला निवडणुका चालू असताना CIB आणणे हे स्वतः च्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे होते आणि NRC वर देशभर चर्चा आणि आंदोलने हे स्वाभाविक च होते. पण मोदी असा माणूस आहे की जो नेहमी लांबचा, देशोपयोगी आणि देशहितासाठी काम करतो. झारखंड च्या पराभवाची कारणे तपासली तर हे एक महत्वाचे कारण आहे. पण देशहितासाठी एखाद्या राज्यातील सत्तेला तिलांजली देणे हे मोदीच करू शकतात. महाराष्ट्र राज्य हे काही मोदी यांच्यामुळे हातून गेले नाही. उद्धव ठाकरे यांचा हट्ट आणि खोटेपणा आणि शरद पवार यांची खेळी यामुळे महाविकासआघाडीचे सरकार बनले आणि आणि ते सरकार जेव्हा पडेल तेव्हा पुन्हा भाजपाचेच सरकार येणार या बद्दल मोदीच काय पण पवार यांनाही खात्री आहे!

ह्या साऱ्या प्रकारात राज्यसभेत मिळणारे स्पष्ट बहुमत थोडेसे पुढे जात आहे पण नवे मित्र जोडून आजही राज्यसभेत बिले पास करून घेता येतात हे मोदी शाह यांना समजले आहे आणि त्यांनी ते दाखवून ही दिले आहे.

अनेक जण प्रश्न सोशल मीडियावर विचारत असतात, भाजपालाच इतका कडाडून विरोध का? भाजपा ने केलेली कोणतीही गोष्ट चुकीची हे बिगर भाजपा पक्ष आणि पत्रकार का सारखे दाखवण्यात व्यग्र असतात? याची अनेक कारणे आहेत, त्यातील मला आकलन झालेली काही कारणे पुढील प्रमाणे:
1. पूर्वीच्या काळात काँग्रेस ही अशी बिले आणत असे आणि कायदेही करत असे पण आजच्या सारखी संपर्काची साधने त्याकाळी नव्हती त्यामुळे सामान्य माणसापर्यंत या गोष्टी खूप उशिरा आणि बहुतेक वेळेत सर्व काही पार पडल्यावर येत असत.
2.सबसे तेज आणि इंटरनेटमुळे आज घरबसल्या लोकसभेत आणि राज्यसभेत आत्ता काय चालू आहे हे कळते. पूर्वी विरोधी पक्षाने सभात्याग केला इतकेच कळत असे.
3. इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळे गोष्टी वेगवान तर झाल्या आहेतच पण सरकार विरुद्ध अपप्रचार करणे फार सोपे झाले आहे. व्हाट्सअप्प वर ग्रुप मधून जो अप प्रचार केला जातो त्याची पूर्वीच्या काळाशी comparison करूच शकत नाही.
4. गरिबी हटाव च्या नाऱ्यात 50 वर्षे मूर्खात काढलेल्या अशिक्षित जनतेला आता तसे सांगता येत नाही.

काहीही झाले तरी मोदी हे त्यांनी ठरवलेल्या नियोजनाप्रमाणेच पुढे जाणार आहेत. आलात बरोबर तर ठीक, नाहीतर एकला चलो रे या धर्तीवर त्यांचे काम व्यवस्थित चालू आहे. अजून बरीच बिले पटलावर यायची आहेत आणि पुढील 4 वर्षात खरोखर बदललेला देश आपल्याला पाहायला मिळणार आहे याबाबत माझ्या मनात मुळीच शंका नाही...

- © मंदार कुलकर्णी
26 डिसेंबर 2019

Wednesday, December 18, 2019

चार दशकांच्या सुगंधित आठवणी

आठवणीतील गाव - पळस्पे





माझा पेपरमध्ये आलेला लेख आवडला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏🏻 बऱ्याच जणांनी हा लेख लहान करून पेपरमध्ये छापला असावा अशी शंका व्यक्त केली. हो, मटा ने तसेच केले आहे. त्यासाठी मूळ लेख जसा आहे तसा आपल्याला पाठवत आहे... सवड झाल्यावर तोही वाचवा... 🙏🏻🙏🏻
_______________________________________
चार दशकांच्या सुगंधित आठवणी
आठवणीतील गाव - पळस्पे
आमच्या अख्ख्या खानदानात १९८० पूर्वी कोणी पळस्पे हा शब्द ऐकले नव्हते. माझ्या वडिलांची बदली पनवेलला झाली आणि पळस्पे येथे राहणे आपल्याला परवडेल असा विचार करून त्यांनी राजेंच्या वाड्यात २ खोल्यात संसार थाटला.

खरे तर बाबांना पनवेलमधे हवे तसे भाड्याने घर मिळाले नाही खूप शोधले तरी. मग कोणीतरी पळस्प्याचा पत्ता सांगितला. बहुसंख्य नोकरी व्यवसायानिमित्त पनवेलला आलेली मंडळी राहण्यासाठी पळस्पे गाठायची. पनवेल पळस्पे अंतर ३ किमी आणि पळस्पे तसे खेडेगाव. हा प्रवास सगळी मंडळी सायकलने करायची. पनवेल नाही म्हटले तर शहर आणि तालुक्याचे गाव. तिथून थेट मुंबईला बस सुटायच्या. पनवेल मुंबईत ५० किमी अंतर असले तर तरी मुंबईचे वारे तेव्हा पनवेलला लागले नव्हते. आपली स्वतंत्र गावाची ओळख ते राखून होतं. कुलाबा जिल्ल्याचा सर्व सरकारी कारभार अलिबाग मधून चालत असला तरी बरीच सरकारी कार्यालये पनवेलला असायची. त्यामुळेही या गावाला वेगळे महत्व होते. मुंबईहुन पुण्याचा राष्ट्रीय महामार्ग पनवेल वरूनच जायचा आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तर पनवेलच्या जवळ सुरू व्ह्यायचा आणि ते ठिकाण म्हणजे पळस्पे फाटा. पाहुण्यांना, नातेवाईक मंडळींना या गावाची ओळख अशा रीतीने आम्ही सांगायचो.

त्याकाळी वाहतुकीची आणि प्रवासाची मुबलक साधने नसल्याने बहुतेक वेळेस पुणे किंवा अहमदनगर येथून येणारी पाहुणे मंडळी पळस्पे फाटा येथे बसमधून उतरून सरळ चालत आमचे घर गाठायची. थोडी पायपीट व्हायची पण पनवेलला उतरून परत बस बदलून पळस्पे गाठायचे म्हणजे जरा अवघडच. त्यात गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुळात वाहने कमी. पेण, अलिबाग, श्रीवर्धन अशी कुठलीतरी बस पकडून पळस्पे आले की वाहकाला विनंती करून पटकन उतरून घ्यायचे. लांब पल्याच्या बसचे चालक पळस्पे येथे बस काही क्षण थांबवायलाही राजी नसायचे कारण त्यांचा पहिला थांबा असायचा पेण. पळस्पे गावची अजून ओळख म्हणजे बस थांब्यापाशी असलेला जुना वड. कमीत कमी दोनशे वर्षे उभा असलेला हा वृक्ष या गावच्या १९ आणि २० व्या शतकातील सर्व घटनांचा उभा साक्षीदार आहे.

माझ्यासाठी पळस्पे हे कायम आदर्श गावच होते. तर अशा अत्यंत लहान खेडेगावात माझी लहानपणची ४ वर्षे गेली. काही शे लोकांची वस्ती, अगदी टिपिकल वाडा संस्कृती असलेले हे गाव. गावात बऱ्याचशा घरात त्याकाळी ही वीज पोहोचली नव्हती. गावातुन एक छोटीशी नदी वाहत होती. नदीच्या काठी एक शंकराचे मंदिर आणि एक विष्णूचे मंदिर, बाजूला एक हनुमानाची मूर्ती ही गदा घेऊन उभी होती. गावात पिकणाऱ्या गोष्टी दोनच. एक भात आणि दुसरा आंबा. बाकी सर्व गोष्टी शहरातून आणाव्या लागायच्या अगदी रोजचे वर्तमानपत्र सुद्धा मुंबईहून बसने पनवेलला आणि पनवेलहून सायकलवर इकडे यायचे आणि मग घरोघरी पोहोचायचे.

पळस्पे हे कोकणातील गाव असल्याने भरपूर पाऊस आणि मुख्य पीक भात. आम्ही शाळेतली मुले भातलावणीच्या काळात शाळेतून रीतसर परवानगी काढून शेतावर मदत करायला जायचो. आमच्यासाठी हा मजेचा भाग असला तरी ज्यांची शेती होती त्यांना मात्र प्रचंड कष्ट उपसायला लागायचे. पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे हस्त नक्षत्र लागले की शेताची नांगरणी, थोडा पाऊस झाला की भाताची पेरणी शेताच्या एका विशिष्ट अंगाला करायची, मग भरपूर पासून झाला की तेथील रोपे काढून परत लावणी करायची. पीक तयार झाल्यावर कापणी, झोडपणी, खुरपणी आणि अनेक कामे. कणगीमध्ये भात सुरक्षित भरून ठेवेपर्यंत कोणाला उसंत नसायची. गावात आंबा भरपूर पण तो रत्नागिरी हापूसच्या शर्यतीत फारसा यायचा नाही. त्यामुळे आलेला आंबा शहरात विकून चार पैसे गाठीशी आणायची वृत्ती. धो धो पावसातही राहणीमानात अजिबात बदल व्हायचा नाही.

पळस्पे गावात प्राथमिक शाळा १५० वर्षांपासून होती हेही एक आश्चर्यच म्हणावे लागेल आणि विशेष म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके याच शाळेत शिकले. त्यांचे गाव शिरढोण इथून जवळच. पूर्वी शाळा एका वाड्यातच भरायची. १० वी नंतरचे शिक्षण घ्यायला मात्र पनवेल गाठावे लागायचे. १ ली पासून आम्हीही गांधी टोपी घालून "अबकड" चा प्रवास आणि ५ वी नंतर चा प्रवास I am 'a' Gopal' असा केला आहे.

गावात त्याकाळी ही ब्राह्मण मंडळींची बरीच घरे होती आणि विशेष म्हणजे सर्व मंडळी म्हणजे अगदी कातकरी समाजातील लोकही अगदी गुण्यागोविंदाने येथे नांदत होती. हायवेवरील गाव असल्याने रात्रीच्या वेळेस ट्रक आणि मोठी वाहने जोर जोरात जायची. सतत हायवे वर अपघात व्हायचे आणि पळस्प्यातली जनता मदतीला धावायची. आम्हा मुलांना तर रात्रीच काय दिवसा सुद्धा हाय वे वरून चालायची भीती वाटायची.

१९८३ साली आम्ही टीव्ही घेतला तेव्हा अख्खा गाव आमच्या घरी टीव्ही पाहायला लोटायचे. त्याकाळी आजच्यासारखे केबल टीव्ही किंवा डिश टीव्ही तर नव्हतेच पण नंतरच्या काळात आलेली दूरदर्शनची लघुशक्ती केंद्रे ही नव्हती. त्यामुळे टीव्ही पाहण्यासाठी उंच छतावर मोठ्ठा अँटेना मुंबई दूरदर्शन केंद्राचे सिग्नल मिळवण्यासाठी लावावा लागायचा. चित्रहार, छायागीत आणि रविवार संध्याकाळी हिंदी चित्रपट लागायचा. तो पाहायला साधारण १०० लोक आमच्या घराच्या पुढच्या खोलीत आणि दारात बस्तान बांधून बसायची. सरपंचाच्या घरीही टीव्ही होता पण तिथे लोक जायला घाबरायची. आमच्याकडे तसा काही प्रश्न नव्हता. कृष्ण धवल चित्र ही सगळी मंडळी गोड मानून पहायची.

पावसाळ्यात जरी भरपूर पाऊस असला तरी बाकी ८ महिने पाण्याचे फारच दुर्भिक्ष असायचे. मी आणि माझ्या आईने मैलोनमैल चालत जाऊन खोल विहिरीचे पाणी भरून आणलेले मला चांगले आठवते. कातकरी मंडळी तर फारच गरीब. कर्नाळा किल्याच्या जंगलातील लाकूडफाटा तोडून, त्याची मोळी करून आम्हाला बंबात जाळायला घेऊन इतक्या लांब चालत येत असत आणि त्यांना कसेबसे ५ रुपये किंवा १० रुपये मिळायचे. गावातील मंडळीही काही श्रीमंत नव्हती. पनवेल पर्यंत चा प्रवास रिक्षा परवडत नसल्याने चालत किंवा सायकलनेच करावा लागायचा. आमच्या घरी वीज असली तरी गावातील बहुतेक घरात रात्री अंधारच असायचा. छोट्या चिमण्या, बावटा असेच कायम दिसायचे. गावातील बहुसंख्य मुले याच मिणमिणत्या उजेडात अभ्यास करीत असत. त्याकाळी मला नेहेमी प्रश्न पडायचा, माझ्या घरी वीज आहे मग यांच्याकडे कशी नाही? याचे उत्तर तेव्हा नाही समजले पण आता त्याचे उत्तर मिळते. अत्यंत गरीबी खूप जवळून पहायला मिळाली.

पळस्पे गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कर्नाळा किल्ल्याचा लाभलेला शेजार. शिरढोणच्या थोडं पुढे गेले की कर्नाळा किल्याचा पायथा लागायचा. तेथे एक पक्षी अभयारण्य ही बनवण्यात आले होते. जटायू हा पक्षी सर्व प्रथम तिथेच पाहिला. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका झाल्यावर जे किल्ले स्वतः जातीने जिंकले होते त्यात कर्नाळा किल्याचा समावेश होता, त्यामुळे आम्हाला त्याचे जास्त कौतुक. त्यात कर्नाळा किल्याचा वरचा सुळका तेथील पंचक्रोशीतून कुठूनही अगदी सहज दिसायचा आणि आम्हाला तर तो शंकराची पिंडच वाटायचा. आमच्याकडे आलेल्या सगळ्या नातेवाईक मंडळींना कर्नाळा आणि शिरढोण ची सहल आम्ही अगदी उत्साहाने करायचो.

पळस्पे येथे आमचे शेजारीही चांगला होता. वटपौर्णिमा, हरतालिका, गणपती, दसरा, दिवाळी, कोजागिरी असे अनेक सण आम्ही एकत्र साजरे करायचो. अडी अडचणीत, आजारपणात याच लोकांनी आम्हाला जिवाभावाची साथ दिली. या गावात लहानपणी मित्रांसोबत कैऱ्या पाडण्यात अनेक उन्हाळे घालवले आहेत.

पळस्पे गावच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नुकतीच मी तेथे एक दिवसाची सहल केली आणि लक्षात आले की आपले गाव आता पार बदलून गेले आहे. लहानपणी खूप लांब वाटणाऱ्या गोष्टी आणि अंतरे आज मला अगदी छोटी वाटायला लागली आहेत. लहानपणीच्या माझ्या छोट्या पायांनी तुडवलेल्या वाटा मला त्यावेळच्या आठवणी तर सांगत होत्याच पण काळाप्रमाणे झालेला बदलही मला जाणवत होता.

मुंबई गोवा हायवेचे रुंदीकरण गेले अनेक दिवस चालू आहे त्यात तो प्रसिद्ध वड कापला गेला आणि तिथे आता एक मोठ्ठा फ्लाय ओव्हर झाला आहे. त्यामुळे अलिबाग गोव्याकडे जाणारी वाहने पळस्पे टाळून कधी निघून जातात तेच कळत नाही. १९८९ साली "जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट" सुरू झाल्यावर या परिसरातील भूगोल पूर्ण बदलून गेला आहे. पळस्पे फाटा येथून JNPT ला संपूर्ण नवीन रस्ता झाल्यामुळे या भागातील वाहतूक अनेक पटींनी वाढली आहे. त्या अनुषंगाने लागणारे कंटेनर आणि त्यांची ठेवायची जागा कंटेनर यार्ड यांनी हा पूर्ण परिसर व्यापून गेला आहे. पूर्वीची भातशेती जाऊन तेथे अवाढव्य आकाराचे कंटेनर दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन मोठमोठ्या ऑटो कंपन्यांना भाडे तत्वावर दिली आहे. एकंदरीत शेतजमीन दिवसेंदिवस कमी कमी होत गेली आहे.

अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वीचे बहुसंख्य वाडे आता जमीनदोस्त झाले आहेत आणि त्याची जागा सिमेंटच्या जंगलाने घेतली आहे. पण हे करताना त्यात नियोजनाचा संपूर्ण अभाव आहे. जिथे जशी मिळेल तशी जमीन घरे बांधून संपवली आहे. वर उल्लेख केलेल्या मंदिरांच्या पाशी एक शिवकालीन बाव (विहीर) आहे. मी लहानपणी उगाचच हुंदडायला जायचे ते एक ठिकाण होते. आज अख्या गावाचे गटार त्या विहिरीत जोडले आहे... त्यामुळे त्याच्या जवळपास ही जाणे आता अशक्य झाले आहे.

शाळेची नवीन इमारत झाली आहे पण माझ्याशी म्हणावा तसा त्याचा कनेक्ट नाही झाला. गावात जी काही थोडी फार जुनी मंडळी उरली आहेत त्यांना भेटून फार छान वाटले. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. तांदळाची भाकरी, भाताचा तो सुगंध परत एकदा मला ४० वर्ष मागे घेऊन गेला भाताच्या शेतात.

आज मुंबईची हद्द पनवेलच्या पुढे गेल्याचे सगळ्याच परिसराचे वारेमाप शहरीकरण झाले आहे. "नवी मुंबई" हे गोड आणि गोंडस नाव घेऊन उधळलेला वारू मुंबईच्या पश्चिमेला केवळ समुद्र असल्याने जाऊ शकला नाही. ओघानेच त्याने पूर्वेची बाजू धरली आणि त्याच्या लाटेत भली भली पळस्पे सारखी गावे वाहून गेली. पळस्पे फाटा हे केवळ एक तिठा न राहता मुंबई JNPT कडे जाणाऱ्या वाहनांना वाट करून देणारा एक मोठ्ठा चौक बनला आहे. एकावर एक फ्लाय ओव्हर, चालू असलेले काम आणि बाजूलाच मुंबई पद्धतीने उभारण्यात आलेल्या गगनचुंबी इमारती. काय खरं आणि काय खोटं? विचार करताना मती गुंग होते. पूर्वी पनवेलहुन मुंबईला आणि ठाण्याला दर तासाला एक बस सुरू झाली तेव्हा आम्हाला केवढे कौतुक वाटले होते. आज मुंबईने पनवेल आणि पळस्पेच गिळंकृत करून टाकले आहे.

लवकरच होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पामुळे हा सर्वच परीसर परत एकदा ढवळून निघत आहे. "नवी मुंबई" तसे "नवीन पनवेल" ही आपल्या कक्षा रुंदावत आहे. मला भीती आहे की शहरीकरणाच्या या लाटेत काही वर्षांनी पनवेल, पळस्पे, शिरढोण, तळोजा, कोलखे, डेरवली, अजीवली अशी असंख्य गावे आपली स्वतःची ओळख गमावून बसतील की काय अशी भीती वाटू लागली आहे. खोपोलीपाशी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाचा जाहिरातीतील पत्ता "न्यू पनवेल" पाहून तर ही भीती जास्तच गडद बनली आहे. लोणावळा तळेगावपाशी तर जाहिरातदारांनी नवीनच शब्द शोधला आहे तो म्हणजे "पुम्बई". पुणे आणि मुंबई यातील अंतर शहरीकरणातून नाहीसे करणारे त्यांच्या मनातले भविष्यकालीन ठिकाण म्हणजे 'पुम्बई'.

आज पळस्पे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांनी जमिनी एकतर विकल्या आहेत किंवा भाड्याने देऊन आपले भविष्य सुनिश्चित केले आहे पण हे करताना आपल्या गावाची ओळख हळूहळू यातून पुसली जात आहे हे कधी त्यांच्या लक्षात येणार? माझ्या मनातील पळस्पे आजही पूर्वीचेच पळस्पे आहे पण येणाऱ्या पिढ्यांनी आपला पत्ता सांगताना पळस्पे सांगायचा की "न्यू पनवेल" की "न्यू मुंबई" सांगायचा याचा विचार करायची वेळ आता आली आहे.

© मंदार कुलकर्णी
१५ डिसेंबर २०१९

Thursday, December 12, 2019

हीच ती वेळ !!!


गेले दीड महिने महाराष्ट्र्र राज्यातील सत्ता स्थापनेचा खेळ खंडोबा आपण पाहिला. ३ पक्षांची मोट बांधून सरकारचा गाडा वाहून नेणारे 'स्थगिती' मुख्यमंत्रीही या राज्याने पाहिले. आजपर्यंत ६ मंत्र्यांनी शिवतीर्थ येथे शपथ घेऊनही १३ दिवस खातेवाटप न झालेले हे भारतातील पहिलेच राज्य असेल. केवळ आढावा बैठकी घेऊन राज्य चालवता येते असे वाटत असेल तर या अनुनभावी मुख्यमंत्री महोदयांची अक्षरशः कीव करावीशी वाटते आहे. या सर्व धामधुमीत एक शब्दसमूह कायम मीडिया ने दुर्लक्षित केला आणि अजूनही त्यातला गर्भितार्थ त्यांना आणि अनुषंगाने वाचकांना कळला नाही असे दिसते आहे. तो शब्द समूह म्हणजे, "हीच ती वेळ !!!"

हा शब्द समूहाचा प्रयोग २०१९ मध्ये सर्वप्रथम कोणी केला तर तो म्हणजे शिवसेनेने. त्यातही तो बातमीसाठी वापरणारे ३च लोक, उद्धव, आदित्य आणि संजय राऊत. सुरुवातीला सर्व साधारण वाटणारा हा शब्द समूह थोडासा ऐकिवात आला तो विधानसभा निवडणुकीत जागा वाटप झाल्यानंतर. आणि परत वापरला गेला तो आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर. तसे त्यांनी ट्विट च केले होते.

लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस मातोश्री वर वडा पाव खायला गेले होते आणि त्यांच्यात जी चर्चा झाली त्यानुसार लोकसभेच्या जागा वाटपानंतर विधानसभेसाठी सुद्धा समसमान जागावाटप ठरले होते. लोकसभेत मिळालेल्या अफाट यशामुळे भाजपाने हे विधानसभेचे गणित अमान्य केले आणि जास्त जागांची मागणी शिवसेनेकडे करायला सुरुवात केली. चंद्रकांत पाटील यांना चर्चेला पाठवून आमची थोडी गरज आहे, असे गोड बोलून भाजपा + मित्रपक्ष १६१ आणि शिवसेना ११७ असे प्राथमिक जागावाटप कोणतीही पत्रकार परिषद न घेता भाजपा ने उरकून टाकले आणि तेही विधानसभेचा उमेदवारीचा अर्ज भरायला काही दिवस बाकी असताना. आणि इथेच शिवसेनेने त्यांची चाल चालायचे ठरवले. आणि त्यांनी म्हटले, हीच ती वेळ !!!

या नंतरच्या शिवसेनेच्या सर्व हालचाली या गुपचूप पण भाजपा च्या विरोधात आणि संपूर्ण युतीधर्म न पाळणाऱ्या होत्या. अनेक ठिकाणी विशेषतः कोकणात भाजपा उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केले. युती झाल्यावर जी पक्षात बंडखोरी झाली, त्यात ही भाजपाने जेथे शिवसेनेचा उमेदवार उभा होता तेथे प्रयत्न पूर्वक बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला. पण याच्या अगदी विरुद्ध चाल शिवसेनेने केली. बंडखोरांना प्रोत्साहन तर दिलेच पण जेथे बंडखोरी नव्हती तेथे राष्ट्रवादी च्या उमेदवारांना उघड उघड पाठींबा दिला.
एका बाजूला नावापुरत्या मोदी यांच्या बरोबर संयुक्त सभा ठाकरे यांनी केल्या पण पाठीमागे वेगळीच चाल खेळणे चालू होते. बाकी कशाला, काही ठिकाणी तर हे इतके उघडपणे चालू होते की नागपूर च्या एका सभेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निवडणुकीनंतर सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार बनवणार हे जाहीर सभेत सांगून टाकले !!

शिवसेनेच्या कुरापती इथे थांबल्या नाहीत. अमित शाह आणि मोदी यांनी अनेक सभात महायुतीचा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच बनणार हे सांगताना ठाकरे आणि मंडळी पद्धतशीरपणे मूग गिळून बसली आणि बरोबर निकालाच्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबरला संपूर्ण निकाल लागायच्या आधीच पत्रकार परिषद घेऊन "आमचे सगळे पर्याय मोकळे आहेत..." असे सांगून "हीच ती वेळ..." सिद्ध करायला सुरुवात केली. त्यांनंतर रोज संजय राऊत यांच्या तोंडून शिवसेनेचा मुख्यमंत्री हा जप पत्रकारांसमोर करून आपला हेतू यथेच्छ रेटून नेण्यास सुरुवात केली.

यावर कळस म्हणजे भाजपा महाराष्ट्र चे प्रमुख आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन घेणेच ठाकरे यांनी बंद केले, त्यांचा निरोप घेणे बंद केले. आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली असे जगाला दाखवले. वास्तविक त्यांचे हे आधीच ठरले होते पण लोकांच्या समोर लगेच गोष्टी केल्या तर डोळ्यात येईल या भीतीने जवळजवळ १ महिना काढला. सोनिया गांधी यांच्या दारात कसे जायचे म्हणून शरद पवार यांना मध्ये घातले.

यात एकच गोष्ट झाली. "हीच ती वेळ !!!" च्या नादात शिवसेना राष्ट्रवादी च्या जाळ्यात अडकत गेली. आतापर्यंत सगळेजण मातोश्री वर भेटायला यायचे पण ठाकरे यांना सिल्वर ओक, ट्रायडंत हॉटेल येथे जाऊन शरद पवार यांच्याशी चर्चा करायला लागली. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे मंडळ राज्यपालांकडे १ तास बसलेले असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना पाठींब्याचे पत्र दिलेच नाही. इतके होऊनही शिवसेनेला आपल्या बाबतीत काय होत आहे याची कल्पना येत नव्हती आणि मुख्यमंत्री पदाच्या जाज्वल्य इच्छेपोटी बाकी अनेक बाबींना तिलांजली द्यायला त्यांनी सुरुवात केली. लक्षात घ्या, मुख्यमंत्री शपथविधीला ना सोनिया गांधी आल्या ना राहुल गांधी.

सत्तास्थापनेचा उन्माद आणि संजय राऊत याच्या सारखे बेलगाम अस्त्र याच्या जोरावर अनेक तडजोडी करत अखेर शिवसेनेने मुख्यमंत्री पद मिळवले आणि लाचारीचा एक नवीन अध्याय सुरू झाला. युतीधर्म न पाळता युतीला निर्विवाद बहुमत असताना विरोधकांशी आघाडी करून मुख्यमंत्री पद बळकवणारे या देशातील ठाकरे हे पहिले 'स्थगिती' मुख्यमंत्री आहेत. निवडणूक आयोग अशा प्रकारच्या वागणुकीला भविष्यात नक्की पायबंद घालेल अशी आपण अपेक्षा करूया...

©️ मंदार कुलकर्णी
११ डिसेंबर २०१९

Wednesday, December 4, 2019

महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या दशा आणि दिशा (???)



विधानसभा निवडणुकीनंतरचा बराचसा घटनाक्रम हा मीडियाने जसा आणि ज्या पद्धतीने सांगितला तसाच घडला असा बहुतेकांचा समज होतो. पण बातम्या जनतेसमोर येतात जेव्हा बंद दाराआड बरेच काही घडलेले असते.

अजित पवारांचा अकस्मात भाजपाला दिलेला पाठिंबा आणि फडणवीस यांना मिळालेले औटघटकेचे राज्य आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधी ह्या गोष्टी कोणत्याही ७०mm इस्टमन कलर चित्रपटापेक्षा कमी रंगतदार नाहीत. प्रश्न आहे तो त्या सर्व छोट्या छोट्या घटना एक माळेत गोवून त्यातील राजकारण नीट समजून घेणे. पण आज मीडिया त्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. बाईट घेण्यासाठी राजकारणी मंडळींच्या कारच्या मागे पळत सुटणे किंवा काहीतरी सनसनाटी बातमी मिळवून आपल्या न्यूज चॅनेल चे टीआरपी वाढवणे एवढेच काम त्यांना आहे. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत कोण मुख्यमंत्री होणार हे त्यांना सांगता येत नव्हते.

अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा काकांना विचारून दिला का स्वतःच्या मनाने दिला हे त्यांच्यापैकी कोणीतरी गीतेवर हात ठेवून किंवा शपथपत्रावर सही करून सांगत नाही तोवर गुलदस्त्यातच राहणार आहे. पण तो एक मुद्दा सोडला तर २४ ऑक्टोबर पासून घडलेल्या घटना आणि वेगवेगळ्या पक्षांनी संधीचा मिळवलेला फायदा याची नक्कीच लिंक लावता येते.

मुळात याची सुरुवात झाली ती विधानसभा निकालाच्या दिवशी. ज्या क्षणी शिवसेनेच्या लक्षात आले को भाजपाला गेल्या वेळपेक्षा १७ जागा कमी मिळत आहेत आणि स्वबळावर ते १४५ हा आकडा अपक्षांना घेऊनही गाठू शकत नाहीत, तेव्हाच सर्व प्रथम उद्धव ठाकरे यांनी भाजपाला "आमचे सर्व मार्ग मोकळे आहेत" हे सूनवून दबाव बनवायला सुरुवात केली. यात सत्तेत अर्धा वाटा याचबरोबर मोदी शाह यांनी नाक घासत मातोश्रीवर युवून बोलणी करावी हीच अपेक्षा आणि सुप्त इच्छा होती. संजय राऊत यांचा रोजचा दिवस रात्र घातला जाणारा रतीब हा त्याचसाठी चालू होता. त्या अपेक्षेला अहंकाराने इतका जबर विळखा घातला की देवेंद्र फडणवीस यांचा फोन घेणेही त्यांनी बंद केले.

गेले २५ वर्षाची सवय ती, लगेच कशी मोडणार? शिवसेनेने रुसून बसायचे आणि मग प्रमोद महाजन किंवा तत्सम मंडळी मातोश्रीवर जाणार आणि त्यांची समजूत काढणार. शिवसेनेकडून कोणतीही मदत हवी असली की सगळेजण मातोश्रीच्या पायऱ्या झिजवणार, यात अडवाणी पासून अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. अगदी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर आले होते आणि त्यांना काँग्रेसचा उमेदवार असूनही "इगो शमला' म्हणून शिवसेनेने भाजपाच्या विरोधात जाऊन पाठिंबाही दिला होता. असो.

पण तसे काही होणार नव्हते. मोदी आणि शाह यांना शिवसेनेचा इगो आपल्या राजकारणापेक्षा मोठा नाही हे लक्षात आले आणि आणि त्यांनी महाराष्ट्राची सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आणि अगदी गरज पडेल तिथे मदत करू असे सुचवले. इकडे शिवसेनाचा असा पवित्रा पाहून आधी विरोधी पक्षात आनंदाने बसायला मान्यता देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मनातही लाडू फुटायला लागले आणि सत्तेची स्वप्ने पडू लागली. विशेषतः काँग्रेस च्या स्थानिक नेत्यांमध्ये. ज्यात होते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे माजी मुख्यमंत्री. पण यात शिवसेनेपेक्षा मुख्य अडथळा होता सोनिया गांधी. त्या हे मान्य करतील का... मग हुशारीने ही कामगिरी फत्ते करण्यासाठी त्यांनी शरद पवार यांना आधी हरभऱ्याच्या झाडावर चढवले आणि शरद पवार ही आनंदाने दिल्लीच्या वाऱ्या या संदर्भात करु लागले. शरद पवार यांनीही काही जुनी दाखले देत आणि काही भूलथापा दाखवत सोनिया गांधी यांचे मन वळवले पण या सगळ्या प्रकारात उद्धव ठाकरे काही दिल्लीला गेले नाहीत, कारण पुन्हा एकदा इगो. पण तोपर्यंत पवारांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुंबईतील घराचे (सिल्वर ओक) उंबरठे झिजवायला लावले. आश्चर्य म्हणजे शरद पवार मुंबई विमानतळ आणि सिल्वर ओक या दोन ठिकाणांच्या मध्ये ' मातोश्री' येत असूनही एकदाही तेथे उद्धव ठाकरे यांना भेटायला किंवा दिल्लीचा निरोप द्यायला गेले नाहीत.

शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचे मत बऱ्यापैकी वळवल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आता पुढाकार घेऊन महाशिवआघाडी बनण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली. आता प्रश्न होता या ३ पक्षांची मोट कधी बांधणार? शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी , तर काँग्रेसचा माजी अध्यक्ष अमेठी मधून हरण्याची खात्री झाल्यावर केरळ मधून मुस्लिमबहुल प्रदेशातून कसेबसे निवडून आलेले. पण निवडणुकीपूर्वी ठाकरे अजमेर दर्ग्याला गेल्यामुळे आणि मुंबईत दाक्षिणात्य बहुल प्रदेशात लुंगी नेसून प्रचार केलेला असल्याने "आता काहीही अशक्य नाही" हे पवारांच्या लक्षात आले आणि पहिले काम त्यांनी केले ते 'शिव' शब्द काढून महाविकासआघाडी हे नवीन नामकरण. शिवसेनेला तीनही पक्षांच्यामध्ये सर्वात जास्त जागा असल्याने ते मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरणार हे गृहीत धरून बाकी सर्व मलई आणि महत्वाची खाती कशी पदरात पाडून घेता येतील यासाठी रस्सीखेच सुरू झाली. सुरुवातीला काँग्रेस - राष्ट्रवादी आणि नंतर तीनही पक्ष यांच्यात भरपूर भांडणे आणि मतभेद झाले आणि अगदी आघाडी तुटेपर्यंत ताणले गेले. अचानक देवेंद्र फडणवीस यांचा ८२ तासाचा एपिसोड झाला आणि सगळे चित्र बदलून गेले. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री हे स्वप्नच राहणार अशी स्थिती निर्माण झाली पण बेभरवशाचे अजित पवार स्वगृही परत आले आणि सो कॉल्ड बंड शमले.

याच परिस्थितीचा व्यवस्थित फायदा उठवत पवारांनी उद्धवना मुख्यमंत्री होण्याची आज्ञा वजा विनंती केली. मी जितके उद्धव ठाकरे यांना ओळखतो त्यानुसार त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांची गादी चालवताना त्यांच्या प्रमाणेच पावले टाकत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आणि सरकारचा रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवायचा हा त्यांचा शेवटपर्यँत प्रयत्न होता. तसे त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवले होते. उद्धव ठाकरे मनात एक आणि ओठावर एक या पद्धतीचा माणूस नाही. (याचा अर्थ तो खोटं बोलत नाही असा नाही, बरं का)

उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण ३ पर्याय होते. पहिला पर्याय अर्थातच शिवसेना विधानसभा गटनेता एकनाथ शिंदे. त्यांना मुख्यमंत्री करून रिमोट आपल्या हातात ठेवणे सर्वात सोपे होते. शिवाय चुका केल्या तर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा शिव्या खायला दुसरा चांगला माणूस त्यांना कोण मिळणार? दुसरा पर्याय आदित्य. पण त्याचे वय आणि महाविकासआघाडी यातील तारेवरची कसरत त्याला झेपणार नाही हे ओघानेच आले. तिसरा पर्याय म्हणजे संजय राऊत. त्याने एक महिना केलेल्या प्रेस कॉन्फरन्स आणि शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची बाजू लावून धरण्याचे कसब यासाठी हे बक्षीस म्हणून त्यांचा नक्कीच विचार केला असणार. पण संजय राऊत यांचा सडेतोड स्वभाव, अरे ला कारे करायची आणि सतत भांडणे करायची तयारी मग ३ पक्षाची मोट कशी वाहून नेणार या विषयी नक्कीच प्रश्न असणार.  शरद पवार यांनी याच संधीचा फायदा घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले आणि त्यांचा हातातला रिमोट कंट्रोल अलगद काढून स्वतःच्या हातात घेतला.

कुठलाही प्रशासकीय अनुभव नसलेला, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका अशी कोणतीही निवडनूक न लढवलेला आणि न जिंकलेला एक माणूस अशा प्रकारे आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि फडणवीस विरोधी पक्ष नेता.

आता या सर्व गोंधळात, हे ३ पायाचे सरकार चालणार तरी किती दिवस? काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ, गृह, रेव्हेन्यू स्वतःकडे ठेवली आहेत अशी बातमी आहे. विधानसभा अध्यक्षपदही काँग्रेसकडे आले आहे. या पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उप मुख्यमंत्रीपद ही पुढील विस्तारत  येण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन २.५ वर्षाचे मुख्यमंत्री पद ही बळकावले जाऊ शकते. प्रश्न आता एवढाच आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या नेत्यांपुढे उद्धव  ठाकरे किती दबून काम करू शकतात. गेल्या ३ दिवसात फडणवीस सरकारचे अनेक निर्णय फिरवायचे आदेश दिलेच आहेत. मेट्रो पेक्षा त्यांना मासे पाहण्यात जास्त रस आहे. अजून काही महिने तरी ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पासून धोका नाही. (त्यांचे खरे कारण इथे लिहू शकत नाही कारण सगळे जाणतात)

हिंदू हृदय सम्राट मधील हिंदू काढला. काल हिंदुत्वाची नवीन व्याख्या करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. साधा सेक्युलर शब्दाचा अर्थ माहीत नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दुर्दैवाने आज पहावा लागत आहे. ५ वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या xxx ची ही टोळी आहे. भाजपा सरकारने विकासाचे आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी चालू केलेले सर्व प्रकल्प त्यांना थांबवायचे आहेत, ऑन लाईन आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार उलथून टाकायचा आहे. विलासराव देशमुख यांच्यासारख्या अनेक गरीब शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यायची आहे. भीमा कोरेगाव प्रकरण दाबायचे आहे, देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक गोष्टींचा पुनर्विचार करायचा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला आज तरी अभय आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या ऐकून घेण्याला आणि स्वाभिमानाचा कडेलोट होईल, त्या दिवशी हे सरकार पडेल आणि पुन्हा निवडणुका जाहीर होतील.

लोकशाहीचा खेळ असा अजून किती काळ चालू राहील ते पंढरीच्या पांडुरंगालाच ठाऊक...

**

- © मंदार कुलकर्णी
४ डिसेंबर २०१९

Tuesday, December 3, 2019

Letter to Election Commission of India


Date: 3 Dec. 2019

To,
Election Commission of India
Nirvachan Sadan, Ashoka Road, New Delhi 110001  

Hello Sir,

I am writing this email to you regarding the recent assembly elections held in Maharashtra. You know that the elections were held on 21st Oct. and the results were declared on 24th Oct. 2019.

You are very well aware that BJP and Sena has made alliance before the election and they had done the joint campaign. They have kept the candidates common at most of the places. As per the records from EC, Shiv sena received  90L votes in all. Since BJP had not kept any candidate at those (SS) constituency, the voters who wanted to vote BJP were been forcefully have to vote to Sena candidate. Similar thing might have happened other way also but looking at the control and reach of BJP is concerned, 1st possibility is likely to be happened more. 

Later Sena done the break up with BJP and joined hands with INC and NCP. This means those the people who voted to Sena were been cheated completely.  They want to vote Fadanvis and Modi but voted to Sena being alliance but their vote gone waste. 

On one side, election commission asks for free and fare election, and such a large number of voters are getting cheated, then whats the use of such elections? The number is far more than NOTA and your consideration is badly required in this. In this case, people voted for BJP, but went to SS and benefited to INC and NCP. This has defeated the complete purpose of free and fair elections.

I didn't see any communication from EC on this subject and you need to really think on this issue. 

Can you please discuss within your team and come out with some solution on this issue? You need to come out with some ideas and controls to avoid this future. You also need to check the possibility whether if alliance is made pre-election, they should not break and run away with other parties. Something like that... 

Request earliest reply is highly appreciated. You can connect me on my email or on my mobile number if you want to discuss more on this issue.
--
With Regards,

Mandar V. Kulkarni